Friday, March 2, 2018

जीवनचक्र

पानगळ सुरू होते
काळ सरत जातो
झाड ओसाड होत जात
मग पुन्हा येते कोवळी
हिरवीगार पालवी
बहरून टाकते वृक्षाला

अंधार दाटुन येतो
रात्र सरकत जाते
सारं विश्व लुप्त होत
दाटलेल्या काळोखात
मग हलकेच येतात
कोवळी किरणे
नवीन ऊर्जा देत विश्वाला
थंडावलेल्या क्रिया
पुन्हा जाग्या होतात
व पळू लागतात
लाजवून वेगाला

शरीर भिजुन जाते घामाने 
तप्त धरणी आग ओकते
रविकिरने देवु पाहतात
कडक लाल पहारा
काळ सरू लागतो
काळे ढग जमू लागतात
सुटतो सोसाट्याच्या वारा
सुरू होतात पाऊस धारा
तृप्त होऊनी माती
बहरून येते हरित तृणांने
वाहु लागतात नद्या साऱ्या

अदृश्य होत समोरचं सार 
एवढ्या समस्या दाटुन येतात
चिंता अस्वस्थता असुरक्षितता
घेरून टाकतात जीवाला
वेळ शोधत असते
पर्याय आपल्या सोबत
तुम्ही तग धरून
टिकलात हिंमतीने
की वेळच देवु लागते उत्तरे 
सृष्टीचक्राच्या नियमाने

मग पुन्हा फुटते नवीन पालवी
कोवळी किरणे जागी करतात
वाहु लागतात पाऊस धारा ...

- जतिन #jatinsankhepoetry

No comments:

Post a Comment